आधीचे अटी शर्ती निकषवाले सरकार. तर आताचे पंचनामेवाले. परतीचा पाऊस शेतकऱ्यांना बुडवणारा ठरला. एका शेतकरी तरुणाचा बुडालेल्या शेतातून ग्राऊंड रिपोर्ट... #ओलादुष्काळ सिद्ध करणारा अस्सल पंचनामा...
@ganesh_ghorband
तुम्हीही मांडू शकता - संपर्क ७०२११४८०७०
पाहा
मराठवाडा, कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या इतर भागातही शेतकरी कधी सुका तर कधी ओला दुष्काळ पडत असल्यानं पिडलेला असतो. यावेळी पाऊस चांगला झाल्यानं...अगदी दुष्काळी टापूतही शेतकरी सुखावले. पण तेवढ्यात परतीच्या पावसानं सैतानासारखं झोडलं. सारं बुडवलं. कुठे भाक, कुठ नाचणी, कुठे कापूस, कुठे सोयाबिन सारं सारं हातचं गेलं. सरकार सांगतंय पंचनामे करु मग नुकसानभरपाई देऊ!
सारं बुडालेल्या शेतकऱ्यांचं जीवनच बुडत असताना सत्ताधारी असं का बोलतात?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं ते योग्यच...पंचनाम्यांसाठी का थांबता?
विरोधात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो की काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते ते आता तसे का बोलत नाहीत? सत्तेतील चेहरे बदलले तरी वृत्ती तशीच का? शेतकऱ्यांना हक्काचं पीक कर्ज का मिळत नाही? भाजप सरकारच्या अटी शर्ती निकष जसे शेतकऱ्यांना भोवायचे तसेच आताच्या आघाडी सरकारचेही का? अस्वस्थ करणारे काही प्रश्न
मुक्तपीठसाठी नांदेडचे एक तरुण शेतकरी गणेश घोरबांड यांनीच आपल्या गावांमधील बुडालेल्या शेतांमधून ग्राऊंड रिपोर्ट मांडलाय...आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत...तिथं त्यांनी नोकरशाहीच्या विळख्यातून बाहेर येऊन थेट शेतकऱ्यांना भेटावं. समजून घ्याव्या त्यांच्या मनातील त्यांच्या व्यथा....जाहीर करावा असलेला भोवणारा ओला दुष्काळ...मुक्तपीठचं एवढंच साकडं.
No comments:
Post a Comment